रास्त भावात खरेदी करण्याबाबत आपण किती चोखंदळ आहोत, हे गोपाळराव गोविंदरावांना सागत होते.
''तुम्हाला सांगतो, मी थेट उत्पादकाकडूनच खरेदी करतो. त्यामुळे मालही चांगला मिळतो आणि पैशांचीही प्रचंड बचत होते.''
''ती कशी काय?''
''आता हेच बघा, (पिशवीतली वांगी दाखवत) साधी वांगी आपल्या जवळच्या भाजीवाल्याकडे वीस रुपये किलो आहेत. तुम्ही अगदी मार्केटयार्डात गेलात तरी ती फार तर दहा रुपये किलो मिळतील...''
''मग तुम्ही कशी आणलीत?''
''फक्त चार रुपये किलोने!''
''कुठून?''
''अहो थेट शेतातूनच खरेदी केली. येथून तीस किलोमीटरवरच्या गावात सकाळीच स्कूटरवर गेलो आणि ही एकदम ताजी एक किलो वांगी घेऊन आलो.''
Monday, January 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment