समीरच्या मोबाईलवर मिस कॉल येताच त्याने तातडीने मोबाईल स्वीच ऑफ केला. तेव्हा सचिनने विचारले, ''काय रे, कुणाचा मिस कॉल होता?''
''सायलीचा.''
''अरे! तिच्याशी प्रेमविवाह करूनही सहा महिन्यात तू एवढा बदललास! तेव्हा तू तिने मिस कॉल देताच स्वतः फोन करून तासन् तास हळू आवाजात गप्पा मारायचास. आणि आता तिचा मिस कॉल आला की चक्क मोबाईल बंद!''
''काय करणार... तेव्हा तो हवाहवासा 'मिस' कॉल असायचा...''
''आणि आता?''
''...आता तो नकोसा 'मिसेस' कॉल असतो.
Sunday, December 28, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment